पहिल्याच पावसात अयोध्येतील राम मंदिराच्या छताला गळती?

Jun 25, 2024 - 11:32
 0
पहिल्याच पावसात अयोध्येतील राम मंदिराच्या छताला गळती?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सोमवारी मंदिराच्या छताला गळती असल्याचा दावा केला होता. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान, आता मंदिर बांधकामाच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावर आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, 'मी स्वतः मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून पावसाच्या पाण्याची गळती पाहिली आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून, त्यामुळे त्याचे छत पूर्णपणे उघडे आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबले आणि ते छतावरूनही खाली पडले. अशा प्रकारे मोकळ्या मजल्यावर पाणी पडले. मात्र दुसऱ्या मजल्यावरील छत पुढील महिनाअखेरीस बंद होणार आहे. यामुळे ही समस्या उद्भवणार नाही.

गर्भगृहात भरलेल्या पाण्याबाबत नृपेंद्र मिश्रा म्हणाले, गर्भगृहात पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी हाताने काढले जाते. उर्वरित सर्व मंडपांमध्येही उतार आणि ड्रेनेजची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे पाणी साचत नाही. मंदिर निर्माण समिती करोडो राम भक्तांना आश्वासन देऊ इच्छिते की मंदिराच्या बांधकामात कोणतीही त्रुटी नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही.

सोमवारी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बांधकामात निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मंदिराच्या छतावरून पाणी टपकण्याची ही दुसरी वेळ असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतावरून पाणी आत आले होते. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, देशातील नामवंत अभियंते राम ललाच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीत काम करत आहेत, तरीही ही परिस्थिती आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली.

राम पथावरील रस्ताही खचू लागला

मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या पावसामुळे राम पथावरील रस्ताही खचू लागला आहे. सहादतगंज ते नया घाट या सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या ठिकाणी खोल खड्डे पडले होते. मात्र, सहदतगंज, हनुमानगढी, रिकबगंज आदी ठिकाणी खडी व माती पीडब्ल्यूडीने टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow