कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद
रत्नागिरी : रेल्वे चालवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत जेणेकरून हजारो लोकांचा प्रवास सुरक्षित होईल यावर मार्गदर्शन करताना कोकण रेल्वेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
सोमवारी (ता. १) रत्नागिरी येथील काजळी क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात झा यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे आणि कोकण रेल्वेचे अन्य अधिकारी यांच्यासह प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाशी थेट संबंधित असलेल्या रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेगाडया चालवणारे लोको पायलट, असिस्टंट लोकोपायलट यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांशी झा यांनी संवाद साधला. हजारो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास या मंडळींच्या हातामध्ये असतो. त्यामुळे कर्मचा-यांनी आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, आपले आरोग्य आणि मानसिकता राखण्यासाठी काय केले पाहिजे यापासून कुटुंबीयांनी या व्यक्तीना कशा पद्धतीने सांभाळले पाहिजे, याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ट्रेन चालवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, जेणेकरून हजारो लोकांचा प्रवास सुरक्षित होईल, याबाबत झा यांनी सूचना दिल्या, लोको पायलट यांच्याबरोबरच तिकीट तपासनीस यांच्याशीही झा यांनी संवाद साधला. प्रवाशांशी थेट संबंध येणाऱ्या तिकीट तपासनीसांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता प्रवाशांशी संवाद साधावा, असे झा यांनी सांगितले. कोकण रेल्वेमार्गावरील विविध विभागांत जाऊन कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. शनिवारी मडगाव येथे कार्यक्रम झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 02/Jul/2024
What's Your Reaction?