राजापुरात पावसामुळे १५ लाखांचे नुकसान
राजापूर : तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. गेल्या सुमारे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता यांचे अंशतः नुकसान होऊन सुमारे १५ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासोबत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला आहे.
भातलावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. अनेक गावांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये भातशेतीची लावणी असल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये पडझड होऊन घरे, गोठे यांच्यासह सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्यामध्ये ३५ घरांचे आणि ४ गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. ७ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, चार जनावरे मृत्यूमुखी पडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 13/Jul/2024
What's Your Reaction?