रत्नागिरी : संवेदनशील घटनांमध्ये परिस्थिती कौशल्याने हाताळणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव

Jul 23, 2024 - 17:05
 0
रत्नागिरी : संवेदनशील घटनांमध्ये परिस्थिती कौशल्याने हाताळणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आगामी सण उत्सव, येणारी विधानसभा निवडणूक, नजिकच्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज झाली. 

बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत आदी उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये विशाळगड तसेच जिल्ह्यातील घडलेल्या प्रसंगाबाबत पोलीस आणि जिल्हा  प्रशासनाने अत्यंत चांगली परिस्थिती हाताळली. आपत्ती व्यवस्थापनही उत्तम करुन नुकसान भरपाई, सानुग्रह मदत केली त्याबद्दल पोलीस अधीक्षक, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन यांचा अभिनंदनाचा ठराव सदस्य गजानन पाटील यांनी मांडला. त्याला सर्वांनी उचलून धरत पाठींबा दिला. त्याचबरोबर पूर्णगड येथे विठ्ठल मंदिरामार्फत श्री विठ्ठलाचा सोहोळा कार्यक्रम केला होता. त्याचवेळी अजान सुरु झाल्याने वाद्य वाजवणे थांबविले. हा आदरभावनेचा, एकात्मतेचा प्रसंग सांगून सदस्य महमद बिजापुरी यांनी त्या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, मुकेश गुंदेचा, पत्रकार हेमंत वणजू, दत्तात्रय शिंदे, मुसद्दिक मुकादम, अझीम होडेकर, राहूल पवार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow