राजापूर : दांडे येथील सागरी पूल हलक्या वाहनांसाठी खुला
नाटे : राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरून जाणाऱ्या दांडे येथील सागरी पूल गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मागील दीड वर्षे याचे काम सुरू होते. अखेर जुलैमध्ये या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.
सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या या पूलाचा एक पिलर तीन चार वर्षातच खचला होता. पुलाला आणखी धोका पोहचू नये यासाठी यासाठी प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर ही जवळपास तीन-चार वर्षे या पुलावरून एसटीची वाहतूक वगळता सर्व वाहतूक अनधिकृतपणे सुरू होती. पिलरच्या दुरुस्तीसाठी सुरुवातीला सुमारे पाच कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र तो निधी वेळेवर न मिळाल्याने त्यामध्ये वाढ होऊन जवळपास आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.
शासनाकडून हा निधी उपलब्ध झाल्यानंतर आणि सर्व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर मार्च २०२३ रोजी या पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. दोन ते तीन महिन्यांमध्ये या पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या पुलाचे काम जवळपास दीड वर्ष सुरू होते. अजूनही हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेला नाही. दुरुस्ती केलेला पुलाचा भाग आणि जोड रस्त्याचे डांबरीकरण अजून शिल्लक असून, हे काम पावसाळ्यानंतरच होणार आहे. मात्र, तोपर्यंत पर्यंत हलक्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आली असून, एसटी आणि अन्य अवजड वाहतुकीसाठी गणेशोत्सवापर्यंत प्रतीक्षा करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 29/Jul/2024
What's Your Reaction?