रत्नागिरी जिल्हा परिषदेत ५०८ बेरोजगारांना कामाची संधी

Aug 9, 2024 - 12:12
Aug 9, 2024 - 12:16
 0
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ५०८ बेरोजगारांना  कामाची  संधी

रत्नागिरी : जिल्हा परिषदमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अनेक वेळा कामांचा खोळंबा होतो. त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो. आता जि.प. मध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे. त्यातून मनुष्यबळ उपलब्ध होत होणार आहे. ५०८ जागा भरणार आहे. त्यांना राज्य शासनाकडून मानधन मिळणार आहे.

महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्य विभागामार्फत राज्य सरकारने बेरोजगार तरुणांची मानधन योजनेचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदव्युत्तर, आयटीआय पदवी, झालेल्या बेरोजगार तरुणांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी आवश्यक आहे. नंतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करता येतील. जिल्हा परिषदेमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड होईल. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआयसाठी आठ हजार रुपये आणि पदवी, पदव्युत्तर बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

याच योजनेतून जिल्हा परिषदेमध्ये ५०८ पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यांनी शासन निर्णयानुसार नावनोंदणी केलेली आहे. ते उमेदवार अर्ज करू शकतात. गुणपत्रकांच्या गुणानुक्रमानुसार ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहेत पदे
वाहनचालक, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ अभियंता, स्त्री परिचर, सफाई कामगार, चौकीदार आदी पदांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow