रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहतूक कोंडी
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने कार्यालयाकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या कार्यालयाकडे जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार तिथेच असणारे श्री हनुमान मंदिराजवळून करण्यात आले आहे. मात्र, फेरीवाल्यांनी रस्त्यातच मांडलेली दुकाने ही वाहतूक कोंडीला डोकेदुखी ठरत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. तसेच शैक्षणिक, जमिनींसंदर्भात लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी खेड्या-पाड्यातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. इतर शासकीय कार्यालये देखील जिल्हाधिकारी कार्यालय वाहनांना पार्किंगची मोठी समस्या निर्माण होते. यातच फेरीवाल्यांनी रस्त्यातच मांडलेल्या दुकानांमुळे बाहेरील मुख्य रस्त्याच्या बाजूलाही एखादी गाडी पार्क करू शकत नाही, अशी अवस्था आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन पार्किंग पाहता वाहने उभी तरी कुठे करावयाची, असा सवाल वाहन चालकांकडून विचारला जात असतो.
जिल्हाधिकारी कार्यालय वाहन पार्किंगमध्ये दोन ते तीन गाड्या उभ्या असतात. मात्र, वाहतुकीची समस्या पाहून व्हीआयपी गाड्यांसाठी असा फलक लावण्यात आला आहे. महत्त्वाची बैठक असल्यास प्रमुख अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्क केल्या जातात अन्य वेळेस एखादे लहान वाहन देखील पार्क केल्यास तिथेच नजर ठेवून असलेला कर्मचारी येतो अन् पार्क केलेली गाडी बाजूला करण्याचे आदेश देतो. यातून पार्किंगच्या समस्येबाबत नागरिकांमधून खंत व्यक्त केली जात आहे.
न. प. कडून ठोस
उपाययोजना आवश्यक शहरातील काही रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होऊन रस्ते मोठे झाले तर काही भागांत रस्ते तोकडे पडत असले तरी रस्त्यांवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, फेरीवाल्यांनी रस्त्यातच मांडलेली दुकाने, रस्त्यातील हातगाड्यांमुळे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 26/Aug/2024
What's Your Reaction?