रत्नागिरीत पावसाची उघडीप..
रत्नागिरी : पुढील चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण असेल. तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यांतही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू लागला होता. उकाड्याने किनारी भागातील जनजीवन हैराण झाले होते. मात्र, अधूनमधून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण असेल, तसेच पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली असून, ऑगस्ट महिन्यातील पावसाची हजेरी अतिरिक्त पावसात भर घालत आहे. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 31-08-2024
What's Your Reaction?