रत्नागिरी : जेसीबी ऑपरेटर नसल्याने विकासकामे खोळंबली
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जेसीबी ऑपरेटर सुट्टीवर गेल्याने जिल्ह्यातील अनेक विकासकामांची गती मंदावली आहे. जेसीबी चालवणारे ऑपरेटर आल्यानंतर या विकासकामांना गती येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांधकाम, रस्ते आदी विकास कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जलजीवन मिशनची कामेही सुरू आहेत. जुनी बांधकामे हटवणे, सपाटीकरण करण्यासाठी जेसीबीची गरज असते. ठेकेदार जेसीबी भाड्याने घेवून ही कामे करत असतात; परंतु जेसीबी ऑपरेटर गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी गेले असल्याने ही कामे रखडली आहेत. गणेशोत्सवानंतर ऑपरेटर कामावर परतल्यानंतर जेसीबीच्या कामांना वेग येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 12-09-2024
What's Your Reaction?