मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी
संगमेश्वर : गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमानी यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, परतीच्या प्रवासासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकामध्ये प्रवासी गर्दी करू लागले आहेत.
गणपती उत्सवासाठी अनेक चाकरमानी गावाला आले होते. सहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे शहराकडे वळू लागले असून, मोठ्या प्रमाणात बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात गर्दी करू लागले आहेत. रेल्वेप्रमाणेच बसचाही उपयोग चाकरमानी करत असून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी दिसत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 14-09-2024
What's Your Reaction?