राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, भाजपावाल्यांनो गळा काढणे बंद करा : ॲड.यशोमती ठाकूर
अमरावती : काँग्रेसचे आणि देशाचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करून गळा काढणे बंद करा, राहुलजीं च्या केसालाही धक्का लावण्याचा विचार करू नका, असा सज्जड इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य समजून न घेता जनतेची दिशाभूल करत राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप ॲड. ठाकूर यांनी केला. यावेळी बोलताना ॲड.ठाकूर पुढे म्हणाल्या की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपने सुरू केलेले आंदोलन म्हणजे राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपने विडा उचललेला आहे, अर्धवट गोष्टी ऐकायच्या आणि जाणीवपूर्वक अर्धवटा सारखे वागायचे हा भाजपचा शिरस्ताच आहे असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधींच वक्तव्य पूर्ण ऐकलं पाहिजे, ज्या दिवशी देशात पूर्ण समानता येईल त्या दिवशी काय चित्र असेल, कुणालाही कशी आरक्षणाची गरज भासणार नाही, असे राहुलजी यांनी म्हटले होते. मात्र या देशात भाजपवाल्यांना समानता आणायची नाही, राहुल गांधी यांची बदनामी खपवून घेणार नाही, जनतेची दिशाभूल करून देश भरकटला जाणार नाही. त्यामुळे तुमची नौटंकी बंद करा, राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, पण लक्षात ठेवा राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा सज्जड इशाराच ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 14-09-2024
What's Your Reaction?