रत्नागिरी, राजापूर मतदार संघावर भविष्यात भाजपचा हक्क : बाळ माने

Jun 10, 2024 - 11:38
 0

रत्नागिरी : आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी व राजापूर मतदार संप भाजपला मिळावा याबाबत केलेली मागणी योग्यच आहे. रत्नागिरी मतदार संघात भाजपची ६५ हजार मते असून, खा. नारायण राणे यांना मिळालेली मते ही भाजपचीच असल्याचे स्पष्ट मत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे सहप्रभारी आणि माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला असता बाल माने यांनी सांगितले की, भाजप शासनाने केंद्र आणि राज्यात केलेल्या कामगिरीमुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ६५ हजार मते मिळत आली आहेत झालेले मतदान हे भाजपची विरासत असल्याचेही बाळ माने यांनी सांगितले.

येथील कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि राजापूर विधानसभेबाबत केलेल्या विधानाला आपले समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी हा भाजपचा पारंपरिक मतदार संघ आहे. आपला पक्ष मोठा झालेला कुणालाही पाहिजे असतो. आम्ही अनेक वर्षे या मतदारसंघात काम करीत आहोत. कार्यकर्ते धडपडत आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघावर भाजपचा हक्क आहे. आम्हीही वरिष्ठांकडे याबाबत मागणी करणार आहोत. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही बाळ माने यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow