Eknath Shinde Speech: “मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो आणि त्यासाठी वाघाचं काळीज लागतं”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना वर्धापन दिनात विरोधकांना थेट आव्हान; रक्ताचे नाते किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही

मुंबई: Eknath Shinde Speech च्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रात्री आपल्याच खासदारांना शिव्या द्यायच्या आणि सकाळी त्यांचे कौतुक करायचे, हे असे चालत नाही. सेनापतीने घरात बसून चालत नाही, त्याने रणांगणात पुढे येऊन लढावे लागते. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे, तुमच्यावर किंवा कार्यकर्त्यांवर संकट आले तर मी छातीचा कोट करून पुढे उभा राहीन. मी डॉक्टर नसलो तरी राजकीय ऑपरेशन अचूक करतो आणि असे ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही.”

हिंमत असेल तर समोर या, आव्हानाला चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट आव्हान दिले. “हे काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायला पाय लागतात; पण तुम्ही जर आलात, तर हे समोर बसलेले शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?” असा कडक इशारा त्यांनी दिला. या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले.

शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, काळजाचा तुकडा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, केवळ रक्ताचे नाते सांगून किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार होऊ शकत नाही. शिवसेना म्हणजे कोणी विकत घेण्याचा जमिनीचा तुकडा नाही, तर तो बाळासाहेबांच्या काळजाचा तुकडा आहे. “बाळासाहेबांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास देत होता आणि ते गेल्यानंतर ज्यांचा त्यांनी आयुष्यभर तिरस्कार केला, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीचा तुम्ही पुरस्कार केला,” अशी टीका त्यांनी केली. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीने आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली आणि आता तेच लोक शिवसेनेचा भगवा मुक्त करणाऱ्यांवर टीका करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सामान्य कार्यकर्त्याला संधी, वशिल्याची गरज नाही पक्षाच्या बांधणीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पक्ष म्हणजे केवळ आमदार, खासदार किंवा मंत्री नसून सामान्य शिवसैनिक हाच पक्षाचा खरा कणा आहे. “माझ्याकडे येण्यासाठी कोणताही वशिला, पैसे किंवा मर्सिडीज गाडी लागत नाही. माझे लक्ष प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याकडे असते. म्हणूनच आम्ही भीमाच्या पोरीला, ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. आमदार किंवा मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून कोणाला थेट संधी मिळणार नाही, तर कर्तृत्व गाजवणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षाची आठवण काढताना शिंदे म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे आणि वंदनीय बाळासाहेब सोडून गेले तेव्हा डोंगराएवढे दुःख होते, पण आज माझे नेते आणि कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न काही लोक सातत्याने करत आहेत; पण आम्ही केवळ खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही. विरोधकांवर उपरोधिक टीका करताना ते म्हणाले, “कुछ लोग छुप छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है,” त्यामुळे आमची युती भक्कम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 20-06-2026