Devendra Fadnavis on Saif Ali Khan : सैफ अली खानवर राहत्या घरात हल्ला, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मुंबईतील (Mumbai) राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यानंतर सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, अभिनेता सैफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केलीये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालाय. याप्रकरणी कारवाई होतं आहे. पोलिसांनी तुम्हाला याबाबत सगळी माहिती दिली आहे. कोणत्या मोटोने त्यांच्या घरात आरोपी घुसले होते? हे तुम्हाला कळलं असेल पोलीस वेळोवेळी माहिती देत आहेत.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असतो

देशातील मेगा सिटींमधील सर्वात सुरक्षित शहर मुंबई आहे. हे खरं आहे की, कधी कधी घटना घडतात. त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. मात्र, त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हटले जाणे चुकीचे आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असतो आणि भविष्यात अधिक कायदा सुव्यवस्था कडक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

कंगना यांनी प्रभावीपणे अभिनय केला

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आणिबाणीचा कालखंड होता, जो इतिहास होता तो इमरजन्सी चित्रपटात मांडण्यात आलाय. इंदिरा गांधी यांच्या चांगल्या गोष्टी सुद्धा यामध्ये दाखवल्या आहेत. ऐतिहासिक घटनाचा मागोवा यामध्ये दिसतो. कंगना यांनी प्रभावीपणे अभिनय केला…आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाला गुंडाळून त्यावेळी ठेवलं होतं. लोकांना जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. 71 ची लढाई खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. इंदिरा गांधी यांनी यांचा संपूर्ण जीवनप्रवास यामध्ये दाखवला. माझे वडील सुद्धा इम्रजन्सी मध्ये जेलमध्ये होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 16-01-2025