रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या जादा फेऱ्या

रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून चाकरमानी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी इतर सर्व जिल्ह्यांतून पर्यटक कोकणात येतात. या वर्षी २५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामासाठी आगारनिहाय जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

सर्व आगारांतून जादा फेऱ्या ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, सोलापूर आदी मार्गावर विभागातील ९ आगारांमार्फत सध्या दैनंदिन लांब पल्ल्याच्या १६४ व मध्यम लांब पल्ल्याच्या एकूण ५४ अशा एकूण २१८ फेऱ्या देखील चालवण्यात येणार आहेत. सध्या चाकरमान्यांच्या प्रवासासाठी मुंबई, बोरिवली, पुणे, ठाणे, नालासोपारा, भाईंदर व विरार, पुणे या मार्गावर जादा रा. प. बस सोडून प्रवासी वाहतू‌क करण्यात येत आहे. प्रवाशांनी महामंडळाच्या बसेस मधून किफायतशीर व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.

आगारनिहाय फेऱ्या
दापोली- तुळजापूर वेळ ११.००, १७.००, तुळजापूर- दापोली १०.००, १७.००, दापोली छत्रपती संभाजीनगर २०.०० खेड- छत्रपती संभाजीनगर १३.३०, शिडी ८.३०, चिपळूण धुळे ९.३०, धुळे चिपळूण १०.३०, बोरिवली ७.००, बोरिवली-चिपळूण २१.१५, चिपळूण नालासोपारा ८.३०, २०.३० रत्नागिरी- मुंबई ६.३०, २०.३० मुंबई-रत्नागिरी २०.३०, ८.३०, राजापूर- ठाणे ९.००, ठाणे-राजापूर ७.००

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 PM 21/Apr/2025