चिपळूण नगर परिषदेकडून पान गल्लीतील गटारांची स्वच्छता

Jun 14, 2024 - 11:02
Jun 14, 2024 - 16:08
 0
चिपळूण नगर परिषदेकडून पान गल्लीतील गटारांची स्वच्छता

चिपळूण  : पावसाळी हंगामात थोड्याशा पावसात देखील पानगल्लीत पाण्याचा निचरा न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामुळे अनेक व्यावसायिकांना त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत असे. गेली तीन-चार वर्षे पावसाळी हंगामात पानगल्ली म्हणजेच पाणी गल्ली झाल्याचे चित्र होते. आता न.प.च्या धडक कामगिरीमुळे यंदाच्या पावसाळी हंगामात पाणी तुंबणार नाही या करिता दोन्ही बाजूकडील कचऱ्याने तुंबलेली गटारे स्वच्छ केल्यामुळे पानगल्लीची पाणीगल्ली म्हणून झालेली ओळख पुसली गेली आहे. शहरातील अर्बन बँक ते भेंडी नाका, पानगल्ली आदी परिसरात थोड्याशा पावसाने देखील पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबून राहण्याचे प्रकार गेली तीन-चार वर्षे सुरू आहे. न. प. प्रशासनाकडून बाजारपेठ परिसरातील मोठी गटारे व नालेसफाई होते. 

तरीदेखील बाजारपेठेत वरील ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून राहण्याचे प्रकार घडत असतात. या बाबत तपासणी केली असता बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटारांवर झालेले अतिक्रमण, कचरा व मातीने तुंबलेली गटारे या प्रमुख उपद्रवी कारणांचा न.प. प्रशासनाला अंदाज आला. त्यानुसार न.प.ने व्यापाऱ्यांना सूचित करून अतिक्रमणांसह गटार साफ करण्याची मोहीम हाती घेतली. दोन्ही बाजूकडील गटारांमध्ये काही टन कचरा, त्यामध्ये मातीसह व्यापाऱ्यांनी दुकानातील टाकलेला टाकाऊ माल, परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नव्हता. तीच परिस्थिती पानगल्लीत निर्माण झाली होती. बहुतांश व्यापाऱ्यांनी पानगल्लीत अतिक्रमणे केली आहेत. परिणामी, दोन्ही बाजूकडील गटारे माती व कचऱ्याने तुंबली होती. आता नगर परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सफाई कामगारांनी गेले दोन दिवस या गल्लीतील गटारांची साफसफाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ही गटारे कचऱ्यातून मुक्त झाली आहेत. पाण्याच्या निचऱ्यासहीत पावसाचे पाणी तुंबणार नसल्याची शक्यता दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow