खेड : विजेच्या खेळखंडोबाने नागरिक त्रस्त

Jun 20, 2024 - 09:50
 0
खेड : विजेच्या खेळखंडोबाने नागरिक त्रस्त

खेड : तालुक्यात यंदा मान्सूनने वेळेत व दमदार हजेरी लावली आहे, पण पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीतच झाला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

खेड शहर व तालुक्यातील काही भागात गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस पडताच काही वेळासाठी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. दिवसातून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, गोठवलेले खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थाचे विक्रेते यांच्यासह झेरॉक्स दुकान व्यावसायिकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. महावितरणने मान्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा खंडित करत देखभालीची कामे देखील पूर्ण केल्याचा दावा केला होता. परंतु त्या दाव्याचा पूर्ण फज्जा उडाला आहे.

वीज बिल न भरल्यास मात्र कारवाई
एकीकडे वीज बिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मात्र, सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आलेले असतानाही महावितरणकडून वीजपुरवठ्याबाबात ठोस कार्यवाही केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow