लांजा : महामार्गावरील आंजणारी घाटातील गतिरोधक धोकादायक

Jun 25, 2024 - 12:45
Jun 25, 2024 - 15:47
 0
लांजा : महामार्गावरील आंजणारी घाटातील गतिरोधक धोकादायक

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी बसवण्यात आलेला गतिरोधक हा अपघातास कारणीभूत ठरत आहे. गतिरोधकाच्या ठिकाणी गेल्या वर्षभराच्या कालावधीत झालेल्या अनेक अपघातांमध्ये चार ते पाचजणांचा जीव गेला आहे. काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही महामार्ग अधिकारी आणि ठेकेदारांकडून हा धोकादायक गतिरोधक हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आंजणारी येथील दोन महिलांचा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्यावतीने गतिरोधक काढून टाकावा, असे निवेदन तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे; मात्र तरीही कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

तालुक्यातील वेरळ आणि आंजणारी घाट हा तीव्र वळणाचा आणि धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आंजणारी घाटातील चौपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. एका बाजूला काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असताना दुसऱ्या बाजूने काम अपूर्ण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow