मिऱ्या-नागपूर महामार्गाची भर पावसात पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांसहित केली पाहणी

Jun 25, 2024 - 09:59
 0
मिऱ्या-नागपूर महामार्गाची भर पावसात पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांसहित केली पाहणी

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर हायवेची केली ग्रामस्थांसहित पाहणी राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मतदार संघात पाऊल ठेवल्यापासून राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या कामाची आढावा बैठक पूर्ण करून धो-धो पाऊस पडत असताना सुद्धा त्यांनी मिऱ्या-नागपूर रस्त्याची पाहणी केली. सोमवार सकाळ पासून पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्टीय महामार्गाच्या कामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत असून ठेकेदारांच्या चुकीच्या धोरणामुळे काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आल्याने त्याचा त्रास नाहक सर्व सामान्य माणुस, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार यांना करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आल्या होत्या. त्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. ती बैठक घेऊन ते थांबले नाही तर धो-धो पाऊस असताना महामार्गांवर प्रत्यक्षात उतरून पाहणी करत ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार यांच्याशी चर्चा केली. 

यावेळी जनतेला त्रास होणार नाही असे काम करा आणि ज्या ज्या चुकीच्या कामामुळे जनतेला त्रास होतोय ती कामे तात्काळ सुधारा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला दिले आहे. 

महामार्गावर पडलेले खड्डे, चुकीची बांधण्यात आलेली गटारे, वाड्या वसत्यामध्ये जाणारे जोड रस्ते याकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांचे लक्ष वेधले. जनतेच्या प्रश्नांसाठी भर पावसात पालकमंत्री उदय सामंत रस्त्यावर उतरुन काम करताना पाहायला मिळाले. यावेळी जमलेल्या लोकांनी पालकमंत्री उदय सामंत संवाद साधला. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow