विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून

Jun 27, 2024 - 09:58
 0
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून

मुंबई : राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session) आजपासून पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.

पूर्ण रणनीतिसह विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी पूर्णपणे तयारी केल्याचं बोललं जात आहे.

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.

राज्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर महायुतीला मोठा धक्का बसला. त्यामुळं यंदाचा अधिवेशनात विरोधकांचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे.

विरोधक कोणते मुद्दे मांडू शकतात?

  • मराठा विरुद्ध ओबीसी वाद
  • पुण्यात सापडलेले अंमली पदार्थांचे अड्डे
  • पॉर्शे अपघात प्रकरण
  • घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना
  • कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव
  • पावसाचा खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती
  • राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था

मराठा-ओबीसी वादावरुन सरकार कोंडीत?

राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद जोरात आहे. त्यातच मनोज जरांगे यानी मराठा आरक्षणात सगेसोयरेचा समावेश करण्याची केलेली मागणी, ओबीसींनी 54 लाख कुणबी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी हे मुद्दे खासकरून सरकाराला मोठया प्रमाणात अडचणीत आणण्याची शक्यता आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बंदी घातल्याच पाहिला मिळालं.

विरोधक आक्रमकपणे लढाई लढण्याची शक्यता पाहता सत्ताधारी देखील हल्ले परतवून लावण्याच्या तयारीत असल्याचं पाहिला मिळतं आहे. राज्यातील जनतेची साहनभुती आपल्या बाजूने वळण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा सत्ताधारी पक्ष करण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणजे मध्य प्रदेश प्रमाणे सरकार राज्यात लाडली बेहना योजना घोषित करू शकतात

मागील काही दिवसांपासून अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरू असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे. सरकारमधील हा बेबनाव झाकून अधिवेशनाला एकसंधपणे सामोरे जाण्याच आव्हान सत्ताधारी पक्षासमोर असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow