Maharashtra Budget 2024 : ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देणार, अजित पवार यांची घोषणा

Jun 28, 2024 - 14:31
Jun 28, 2024 - 15:01
 0
Maharashtra Budget 2024 : ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देणार, अजित पवार यांची घोषणा

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण ३३८ जलाशयांतून गाळ काढण्याचे काम चालू आहे. लोकसहभागातून आतापर्यंत ८३ लाख ३९८१८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित विजपुरवठा व्हावा यासाठी कृषीवाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरउर्जाकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप या योजनेसाठी ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याचे मी जाहीर करतो, असे अजित पवार म्हणाले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 28-06-202

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow