कोकण किनारपट्टी भागात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

Jun 29, 2024 - 09:58
 0
कोकण किनारपट्टी भागात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : मोसमी पाऊस सक्रीय झाल्यापासून गेले दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात कोकणातील बहुतांश तालुक्यात १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. शुक्रवारीही पावसाचा जोर रत्नागिरीसह सिंधदुर्ग जिल्ह्यात होता. मात्र, काही भागात उसंत घेत पावसाच्या सरीवर सरींचा राबता ठेवला होता तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. 

दरम्यान, पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील ४८ तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रत्नागिरीसह रायगड आणि सिंधदुर्ग जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी ८.३० या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ६६ मि.मी.च्या सरासरीने एकूण ५९२. १० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. बहुतांश तालुक्यात ५० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात ८४.३० मि.मी., दापोलीत ६६.४०, खेडमध्ये ५२.६०, गुहागरात ८०.६०, चिपळूणात ४२. ३०, संगमेश्वर तालुक्यात ५३.७०, रत्नागिरी ६५.४०. लांजा तालुक्यात ६९.४० आणि राजापूर तालुक्यात ७७.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, शुक्रवारीही पावसाने जोरदार सुरुवात केली होती. काही तालुक्यांमध्ये पावसाची थोडीशी विश्रांतीही घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow