महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी वैभव पाथोडे रुजू

Jul 5, 2024 - 12:24
 0
महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी वैभव पाथोडे रुजू

त्नागिरी : महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदी पदोन्नतीने श्री. वैभव पाथोडे नुकतेच रुजू झाले आहेत.

ते भंडारा तालुक्यातील लाखनीचे मुळ रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी शाखेत पदवी व व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी पर्यंत झाले आहेत.श्री.पाथोडे हे सन २००७ ला महावितरण मध्ये कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले.

सन २००८ मध्ये सरळसेवा भरतीतून अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. नांदेड, ब्रम्हपुरी, भंडारा येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. सन २०१७ मध्ये पदोन्नतीने कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. नागपूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली. अमरावती (शहर) चाचणी विभाग येथे कार्यरत असताना सरळसेवा भरतीत अधीक्षक अभियंता पदावर निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow