राणे यांच्यामुळे रिफायनरी विरोधकांच्या जीवितास धोका : विनायक राऊत; पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन
रत्नागिरी : रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही, असा इशारा खा. नारायण राणे यांनी दिला असल्याने आपल्या व रिफायनरी विरोधकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांच्या पोलिस कारवाई करावी, असे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
राजापूर दौऱ्यावर आलेल्या खा. नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना गंभीर धमकी दिली आहे. रिफायनरी प्रकल्पाला नाणारमध्ये विरोध होता, त्यानंतर बारसूमध्ये विरोध सुरू झाला. आपण स्वतः, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे यापुढे विरोधकांना परत जाऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी दिली आहे. त्यामुळे याची पोलिस अधीक्षकांनी दखल घ्यावी व कारवाई करावी, अशी विनंती माजी खा. विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 11/Jul/2024
What's Your Reaction?