पीक स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत
रत्नागिरी : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत उलेलखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान वीस आर व इतर पिकाच्या बाबतीत किमान ४० आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत तालुका पातळीवर पहिले बक्षीस रुपये पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये व तिसरे बक्षीस तीस हजार रुपये आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:47 PM 11/Jul/2024
What's Your Reaction?