रत्नागिरी : जयस्तंभ येथे पुन्हा जलवाहिनी फुटली
रत्नागिरी : शहरात जयस्तंभ येथे जलवाहिनीला गळती लागली. याच ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांत अनेक वेळा जलवाहिनी फुटली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरूस्त करून घेतला आहे. जयस्तंभ येथे एकाच ठिकाणी सतत जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडत आहे. महिन्यातून एकदा तरी याच ठिकाणी जलवाहिनीला गळती लागत आहे. हा बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रत्येक वेळी जेसीबीने रस्ता खोदून गळती काढावी लागते. यावेळीही असेच काम करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 13/Jul/2024
What's Your Reaction?