Ratnagiri : कोकण रेल्वेच्या रखडलेल्या प्रवाशांसाठी एसटीची व्यवस्था
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी ते विन्हेरे या स्टेशन्सदरम्यान काल (१४ जुलै) संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही.
दरड हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असले, तरी अतिमुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. काल सुटलेल्या मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस, तसेच तुतारी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकातच रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य स्थानकांमध्येही थांबवण्यात आलेल्या गाड्या त्याच स्थानकांमध्ये रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत असून, रत्नागिरी स्थानकात ४०, चिपळूण स्थानकात १८, तर खेड स्थानकात १० बस पाठवल्या जात आहेत. आज (१५ जुलै) सुटणाऱ्या जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 15-07-2024
What's Your Reaction?