अतिवृष्टी मुळे अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत खिचडी वाटप

Jul 16, 2024 - 09:53
Jul 16, 2024 - 09:59
 0
अतिवृष्टी मुळे अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत खिचडी वाटप

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी ते विन्हेरे या स्टेशन्सदरम्यान रविवारी (१४ जुलै) संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे ठप्प झाली होती. दरम्यान, खोळंबलेल्या प्रवाशांकरिता लायन्स क्लब रत्नागिरी  मार्फत रेल्वेस्टेशन रत्नागिरी या ठिकाणी प्रवाशांना खिचडी वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली.

पावसामुळे दरड कोसळलेले असल्या कारण मुळे अनेक ट्रेन मधील प्रवाशांची वाताहत झाली. या सर्व प्रवाशांचा सहकार्यसाठी लायन्स क्लब रत्नागिरी ने जवळपास ८००  पेक्षा जास्त खिचडीचे पॅकेट चे वाटप रेल्वे स्टेशन रत्नागिरी चा परिसरात केले. या वेळी लायन्स क्लब चे जेष्ठ सदस्य PMJF ला प्रमोद खेडेकर यांचा मार्गदर्शनांखाली सर्व नियोजन करण्यात आले. लायन्स क्लब चे अध्यक्ष ला गणेश धुरी यांचा मंगला हॉटेल मार्फ़त खूप कमी कालावधीत आणि माफक दरात खिचडीचे सोय करून दिली. खिचडी वाटप करते वेळी क्लब चे सचिव विशाल ढोकळे, ला शरद नागवेकर आणि MJF ला adv शबाना वास्ता यांचे सहकार्य लागले.

रेल्वेप्रशासन व पोलीस प्रशासन तसेच प्रवाशांनी लायन्स क्लब चे आभार मानले. तसेच खिचडी वाटप करण्याकरती लायन्स क्लब मधील अन्य सभासद यांनी खिचडी साठी आर्थिक मदत केली व सेवाकार्य उत्तम रीत्या पार पाडले. मदत केलेल्या सभासदांचे विशेष आभार अध्यक्ष ला गणेश धुरी यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow