एक रुपयात पीक विमा योजनेस मुदतवाढ
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाने निर्माण केलेली पूरस्थिती आणि भात लागवड क्षेत्रात असलेली लगबग लक्षात घेऊन खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
योजनेच्या सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै अशी होती. तथापि, योजनेत सहभाग वाढविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबीकरिता विमा संरक्षण लाभणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 19-07-2024
What's Your Reaction?