रत्नागिरीत उद्या आषाढीवारीचे आयोजन
रत्नागिरी : येथे सलग तिसऱ्या वर्षी शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या संकल्पनेवर आधारित आषाढीवारी निघणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बुधवारी (ता. १७) सकाळी ६.३० वा. मारुती मंदिर येथून वारीला सुरुवात होईल. ही वारी माळनाका, एसटी स्टैंडमार्गे, रामआळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचणार आहे. पारंपरिक वेशभूषेत, टाळमृदंग घेऊन आणि तुळशीवृंदावन डोईवर घेऊन हजारो वारकरी वारीत सहभागी होणार आहेत.
अनेक वर्षे विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या; परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात येत आहे. वारीचा मार्ग मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा आहे. वारीला सकाळी ६.३० वा. सुरवात होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अभंग, नामजप, नित्यपाठ, विठुनामाचा जयजयकार करत ही वारी निघणार आहे. वारकरी, भाविकांनी बहुसंख्येने पारंपरिक वेशात, टाळ-मृदंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढीवारी आयोजकांनी केले आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत वितृ माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की, वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. या वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी, अशी माणसाची मनोमन इच्छा असते. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी, शारीरिक मर्यादा यामुळे पिंपन वारीला जाणं होत नाही. त्यामुळे मनातली वारीची ओढ कमी होत नाही. असे अनेक वारकरी रत्नागिरीतल्या वारीत सहभागी होतात. या वारीमध्ये शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून वारकरी मंडळी सहभागी होतात. विठुरायाची पालखी, टाळांचा गजर करत या वारीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 16/Jul/2024
What's Your Reaction?