राजापूर : जुवाठी विद्यालयात अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयात अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरू करण्यात आला. जुवाठी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
यासाठी बी .के .गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर उपक्रमाच्या वह्या मोफत दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर, सहाय्यक शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी. के. गोंडाळ, लिपिक राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे, सुरेश गोसावी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे श्री. गोंडाळ आपल्या शाळेत हस्ताक्षर सुधार उपक्रम राबवत आहेत. यावर्षी त्यांनी प्रथमच या उपक्रमासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने हस्ताक्षर सुधार उपक्रमच्या एक हजार वह्यांची छपाई केली आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह तालुक्यातील इतर काही शाळेतून हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती श्री. गोंडाळ दिली.या त्यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 17-07-2024
What's Your Reaction?