रत्नागिरीत आषाढी वारी मोठ्या उत्साहात
रत्नागिरी : आषाढी एकादशी निमित्ताने आज रत्नागिरीत काढण्यात आलेल्या वारीमध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले होते.
रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील मंदिरापासून सकाळी ही वारी सुरू झाली. ती रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. त्यामध्ये बैलगाड्या आणि चित्ररथ सहभागी झाले होते. टाळमृदंगांच्या गजरात निघालेल्या या वारीमध्ये स्त्रीपुरुष आणि मुले ही मोठ्या उत्साहाने
सहभागी झाले होते. सकाळी पाऊस नव्हता. त्यामुळे वारीमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सर्व भाविकांनी विठोबाचे दर्शन घेतले.
वारीच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरात यात्रा भरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:14 17-07-2024
What's Your Reaction?