रत्नागिरी : हरचिरी मार्गावरील मलुष्टेवाडी येथील मोरी साफ करण्याची मागणी

Jul 18, 2024 - 12:14
Jul 18, 2024 - 15:22
 0
रत्नागिरी : हरचिरी मार्गावरील मलुष्टेवाडी येथील मोरी साफ करण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ते काजरघाटी रस्त्यावर चांदेराई मलुष्टेवाडी येथे असणारी मोरी गाळाने पूर्णतः भरली असल्याने जोरदार पावसात मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे दुचाकीसारखी छोटी वाहने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाण्याची शक्यता असल्याने तातडीने ही मोरी साफ करून घ्यावी, अशी मागणी शिवसेना उबाठाचे विभागप्रमुख महेंद्र झापडेकर यांनी केले आहे.

चांदराई मलुष्टेवाडी जवळ मोठ्या वहाळावर मोरी आहे. या मोरीचा अर्ध्याहून अधिक भाग गाळाने भरून गेला आहे. जोरदार पावसात वहाळाला मोठे पाणी असते. त्यामुळे ते पाणी रस्त्यावरून वाहत असते. या पाण्याला वेगही असल्याने दुचाकी चालकांना अनेकदा रस्ता पार करताना धोका पत्करावा लागतो. या रस्त्याजवळूनच काजळी नदी वाहत असून, दुचाकीस्वाराचा तोल जाऊन पडल्यास पाण्याबरोबर तो नदीत वाहत जाण्याच शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांना माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे महेंद्र झापडेकर यांचे म्हणणे आहे. आठ दिवसांत या मोरीची साफसफाई न झाल्यास आंदोलनाच इशाराही झापडेकर यांनी दिला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow