चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाचा बजेटमध्ये उल्लेख नाही
चिपळूण : केंद्रात मोदी ३.० सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प मंगळवारी मांडला गेला. तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारच्या बजेटमधून चिपळूण-कऱ्हाड रेल्वेबाबत येथील नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वे मार्गाचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
बुलेट ट्रेनवर हजारो कोटी खर्च करणाऱ्या राज्य शासनाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाच्या कामाकरिता हात आखडता घेतला आहे. चिपळूण-कऱ्हाड रेल्वे हा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येणार होता. रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी ५० टक्के खर्च करण्याचा करारही २०१७ मध्ये केला होता. सुमारे चार हजार कोटीच्या मार्गासाठी सर्वेक्षणही झाले होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने जोडला जाणार असल्याने राज्य शासनाने खर्चाचा वाटा उचलला होता. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सरकारची चिपळूण- कराड रेल्वे प्रकल्पाबाबत भूमिका बदलली. रेल्वे मार्ग उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर कोकण रेल्वे महामंडळ, राज्य सरकारने करार केला होता. नंतर मात्र ही करार रद करण्यात आला, खासदार राणे यांनी प्रचारात हा मार्ग अस्तित्वात येईल, असे आश्वासन नागरिकांना दिले होते.
कोकण रेल्वे पश्चिम
महाराष्ट्राशी जोडण्यासाठी चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी केलेल्या मागण्यात चिपळूण- कराड मार्गाचा समावेश आहे. राज्य सरकारने माझी मागणी पूर्ण केली नाही, तर भविष्यात माझा राजकीय निर्णय घेण्यास मी मोकळा असेन - शौकत मुकादम
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 24/Jul/2024
What's Your Reaction?