Raigad Rain: सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नगर परिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना केले सतर्क
रायगड : गेल्या २४ तासांपासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे.
सद्यस्थितीमध्ये महिकावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी धोका पातळीच्या अधिक नोंदविण्यात आली आहे. सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 25-07-2024
What's Your Reaction?