कोल्हापुरात पावसाची उघडीप; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी पुराची पातळी कमी होऊ लागली आहे. राधानगरीचे अद्याप दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पुराचे पाणी संथ गतीने कमी होत आहे.
पडझड सुरूच..
गेली आठ दिवस जिल्ह्यात पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढत आहे. रोज सरासरी २०० पेक्षा अधिक घरांची पडझड होत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २२६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन त्यात ६१ लाख ६६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एसटीचे ६६२ फेऱ्या रद्द
महापुराच्या पाण्याचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. सोमवारी तब्बल ६६२ फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे ६ लाख ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बालिंगा पुलावरून दुचाकीची वाहतूक
कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाशेजारील पाणी उतरले आहे. पण, पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतूक बंद केली होती. सोमवारी सायंकाळपासून दुचाकीची वाहतूक सुरु झाली आहे.
- पंचगंगेच्या पातळीत घसरण : १० इंचाने
- सध्याची पातळी : ४४.७ फूट
- बंधारे पाण्याखाली : ७७
- मार्ग बंद : ५३
- नुकसान : २२६ मालमत्ता
- नुकसानीची रक्कम : ६१ लाख ६६ हजार
हे मार्ग अद्याप ठप्पच
कोल्हापूर ते मलकापूर
काेल्हापूर ते गगनबावडा (बालिंगा येथून दुचाकी वाहतूक सुरु)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 30-07-2024
What's Your Reaction?