रत्नागिरी : खानवली गावातील विकासकामे करण्याची भाजपाकडे मागणी
रत्नागिरी : खानवली गावचा विकास भाजप सरकार करू शकते. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना निवडून देण्याकरिता कार्यकर्त्यांनी बळ दिले. गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांनी खासदार राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे मागण्या मांडल्या आहेत.
ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपत स्वागत करण्यात आले. त्या वेळी विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली. भारतीय जनता पार्टीला तळकोकणात पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खानवली गावात ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यासाठी भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, अनंत चौगुले, वाघोजी खानविलकर, जयेश बंडवे यांनी विशेष मेहनत घेतली. खानवलीतील प्रकाश कालकर, सुनील मांडवकर, प्रदीप मांडवकर, अशोक बंडबे, पंढरीनाथ कालकर, रमेश मांडवकर, अविनाश बंडगे, दीपक बनवे, साहिल कालकर, दत्ताराम बंडबे, संजय कालकर आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना खामकर, सरचिटणीस विराज हरमळे, शैलेश खामकर, युवा अध्यक्ष अजय गुरव, कोटगावचे उपसरपंच रवींद्र नारकर, भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनंत खरात, सुशांत पाटकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 30/Jul/2024
What's Your Reaction?