रत्नागिरी : जिल्ह्यात 106 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई

Jun 1, 2024 - 10:15
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात 106 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई

रत्नागिरी : राज्यात उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाणवठे कोरडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या ग्रामीण भागांमध्ये भेडसावत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 106 गावांमधील 258 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

तब्बल 58 हजार 124 ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील 106 गावांमधील 250 वाड्यांना 24 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. या 24 टँकरमध्ये 4 शासकीय आणि 20 खासगी टँकरचा समावेश आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वच तालुक्यांमध्ये परिस्थिती जवळपास सारखी असल्याचे चित्र आहे.

  • मंडणगड तालुक्यात 5 गावांमधील 5 वाड्यांमध्ये 853 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • दापोली तालुक्यात 15 गावांमधील 20 वाड्यांमध्ये 5 हजार 070 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • खेड तालुक्यात 17 गावांमधील 44 वाड्यांमध्ये 5 हजार 109 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • गुहागर तालुक्यात 2 गावांमधील 6 वाड्यांमध्ये 2 हजार 590 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • चिपळूण तालुक्यात 16 गावांमधील 35 वाड्यांमध्ये 11 हजार 391 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • संगमेश्वर तालुक्यात 24 गावांमधील 42 वाड्यांमध्ये 4 हजार 824 ग्रामस्थांना दोन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
  • रत्नागिरी तालुक्यात 14 गावांमधील 89 वाड्यांमध्ये26 हजार 596 ग्रामस्थांना 13 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • लांजा तालुक्यात 4 गावांमधील 6 वाड्यांमध्ये 675 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
  • राजापूर तालुक्यात 9 गावांमधील 11 वाड्यांमध्ये 1 हजार 016 ग्रामस्थांना 3 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow