कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
पडझड काही थांबेना
यंदा पावसाबरोबर मालमत्तांची पडझड थांबण्याचे नाव घेईना. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५१ लाख ७१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली
हातकणंगले, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 02-08-2024
What's Your Reaction?