राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यात कुठेही मराठा आंदोलन सुरू नाही : मनोज जरांगे
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणीही आडवू नका. कारण, सध्या राज्यात आपलं आंदोलन सुरु नाही हे मी सगळ्यांना सांगितल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जाब विचारायचा असेल तर आपण मुंबईला जाऊन जाब विचारु असेही जरांगे पाटील म्हणाले.
पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा
पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे बंद करा. आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही असे जरांगे पाटील म्हणाले. मी कोणालाच सापडत नाही. माझं नाव सगळ्या नेत्यांसोबत लावली आहेत. देशातलं पहिलं आंदोलन असं आहे की, सातत्यानं एक वर्षापासून सुरु आहे. या आंदोलनात लोकांची संख्या ही लाखात आहे असं जरांगे पाटील म्हणाले. माझ्यावरील लोकांचं प्रेम कमी होऊ शकत नाही. हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. 10 लोक असले तरी मी मागे हटणार नाही. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत ते आम्ही पाडू असेही जरांगे पाटील म्हणाले. प्रविण दरेकर डोक्यावर महापाप घेत आहेत. दरेकर यांनी मराठ्यांचे समन्वयक फोडले आहेत. काही संघटना जमा केल्या आहेत. मला उघडं पाडण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांना हिणवलेलं मला सहन होत नाही
माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. मराठ्यांना हिणवतात ते मला सहन होत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळेच मी माझ्या शरीराचा कधीच विचार करत नाही. मागे हटायचं नाही, लढत राहायचं हे मी ठरवल्याचे जरांगे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 10-08-2024
What's Your Reaction?