उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला : चंद्रशेखर बावनकुळे

Aug 10, 2024 - 12:02
 0
उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करत आहेत. अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचत असल्याचे टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सल्लागार उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाचा दौरा करावा असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना लगावला.

नेमकं काय म्हाले उद्धव ठाकरे?

बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरु असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत असल्याचे बावनकुळे म्हणाले. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात असे बावनकुळे म्हणाले. बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करुन ते आदरणीय मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू , बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली

ज्यांना याही परिस्थितीत राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा असेही बावनकुळे म्हणाले. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिलीय. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे उत्कृष्ठ सल्लागार

हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरुर लोटांगण घालावं, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये असेही बावनकुळे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow