Ratnagiri : आरटीई विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया पूर्ण; जिल्ह्यात ४८८ जणांचा प्रवेश निश्चित
रत्नागिरी : गेले दीड महिने रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ९७ शाळांमधील ८१२ जागांसाठी ५७० जणांना लॉटरी लागली होती. मात्र, या ५७० जणांपैकी २१ अर्ज अपात्र करण्यात आले. ६१ जण प्रवेश घेण्यासाठी आले नाहीत. यामुळे ४८८ जणांना प्रवेश देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने दि. ७ जून रोजी आरटीईची ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. परंतु, काही खासगी शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी आरटीई कायद्यातील बदल रद्द करावा, याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आणि निकाल देण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिन्यापासून रखडली होती.
गेल्या आठवड्यात ५७० जणांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही ६१ जणांनी प्रवेश घेतलाच नाही. तर २१ अर्ज अपात्र करण्यात आले. त्यामुळे ४८८ जणांनी अंतिम प्रवेश घेतला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 13/Aug/2024
What's Your Reaction?