राजापूर : ओणी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करणार

Aug 14, 2024 - 11:15
 0
राजापूर : ओणी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करणार

राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली आहे. वाकलेल्या बांबूच्या बेटांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामध्ये रस्त्याला ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची भर पडत आहे या समस्यांकडे लक्ष वेधूनही बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्पत ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तालुक्यातील पाचल भागातील गावांना जोडण्यासाठी ओणी-अणुस्कुरा रस्ता तयार केलेला आहे. 

कोल्हापूरला जाण्यासाठी याच मार्गांचा वापर केला जातो. मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा राज्यात जाण्यासाठीही हा मार्ग उपयुक्त ठरतो. रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी झाडी वाढल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वळणांवर बांबूच्या बेटांची संख्या वाढलेली आहे. ही झाडे दुतर्फा लोंबत असल्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहुने अनेकवेळा दिसत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी काहीवेळा अपघात होतात. अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे दिशाफलकही झाकून गेले आहेत. एका बाजूला दुतर्फा वाढलेल्या झाडींमुळे वाहनचालक त्रस्त झालेते असताना रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांची भर पडलेली आहे. ओणी, दैतवाडी, सौंदळ, खडीकोळवण, येळवण, रायपाटण, पायल बाजारपेठ, आदी भागांमध्ये रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. हे खड्डे चुकवत वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांमह वाहनचालकांनी वृक्षारोपण करून निषेध करण्याचा इशारा दिला आहे.

गणेशोत्सवात वर्दळ
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेल्यामुळे घाट रस्त्याला वाहनचालकांकडून अधिक पसंती मिळत आहे. गणेशोत्सव काळात या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात, वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडीही होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow