रत्नागिरी : हातिस येथे कल्पवृक्षाच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त नवीन कल्पवृक्षाची लागवड
रत्नागिरी : १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. त्याच दिवशी हातिस ग्रामस्थांनी भैरी जुगाई मंदिराच्या परिसरात एक नारळाचे झाड लावून हा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. त्याला ७७ वर्षे झाली. यावर्षी हातिस ग्रामस्थांकडून बाबरशेख बाबांचे मंदिर परिसरात नारळाच्या झाडाची लागवड करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक जयवंत नागवेकर आणि विजय (बबन) नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, माजी अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांच्या हस्ते लागवड केली. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा सागवेकर, ग्रामपंचायत सदस्या राधिका नागवेकर, पोलिस पाटील संतोष नागवेकर, अंगणवाडी सेविका वेदिका पाटील आणि कल्पिता कीर, माजी ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवेकर, सलोनी नार्वेकर आणि विद्यार्थ्यांनी नारळाचे पूजन केले. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 22/Aug/2024
What's Your Reaction?