रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा 'यलो अलर्ट'

Aug 30, 2024 - 10:14
 0
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा 'यलो अलर्ट'

रत्नागिरी : कमी दाबाचा सक्रिय झालेला पट्टा बाष्पविरहित झाल्याने आणि बंगालच्या उपसागरात वादळी स्थिती निर्माण झाल्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी पावसासाठी अनुकूल ठरत आहे. येत्या ४८ तासांत कोकणातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

गेल्या सोमवारी कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सक्रिय होता. मंगळवारीही पावसात सातत्य होते. बुधवारी पावसाचा जोर ओसरलेला होता. गुरुवारीही पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, वातावरणात मळभ आणि गारवाही कायम होता. हलक्या ते मध्यम सरींची हजेरी अधूनमधून सुरू होती. मात्र, पुढील ४८ तासांत रत्नागिरीसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, गुरुवारी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २२.०७ मि.मी. च्या सरासरीने १९८ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यात २३ मि.मी., दापोली १७.८५, खेड ३२.१४, गुहागर १२.६०, चिपळूण २४.११, संगमेश्वर २७.३३, रत्नागिरी ११, लांजा २८.६०, राजापूर तलुक्यात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३२ मि.मी. च्या सरासरीने पावसाने ३२ हजार ५०० मि.मी.ची एकूण मजल गाठली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow