छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून होणारे राजकारण दुर्दैवी : ना. उदय सामंत
रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही अतिशय मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली खंत दुःखद बाब आहे. मात्र, यावरून महाराष्ट्रात राजकारण होणे, हे असल्याचे दुर्दैवी पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात अतिशय वाईट पद्धतीने राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत १०० वेळा माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तरीदेखील खालच्या पातळीवर यावर राजकारण सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणचे सुशोभिकरणाचे काम 'उबाठा' गटाच्या एका कार्यकर्त्यांकडे देण्यात आले होते, आणि तेच लोक या बाबत आता टीका करत आहे, अशी खंत ना. सामंत यांनी व्यक्त केली. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणे बंद केले पाहिजे, असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 31/Aug/2024
What's Your Reaction?