राजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपालाच मिळावा - राजश्री विश्वासराव

Sep 3, 2024 - 09:51
 0
राजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपालाच मिळावा - राजश्री विश्वासराव

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधून दावे-प्रतिदावे होत असले, तरी गेल्या काही वर्षांत भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता हा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे. तसेच येथील उमेदवार स्थानिकच असला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या राजापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख राजश्री विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेत केली.

राजापूर मतदारसंघातील महिला मतदारांची ५७ टक्के संख्या लक्षात घेता या विधानसभा मतदारसंघातून महिलेला उमेदवारी मिळायला हवी, असे सांगून आपणदेखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा निर्णय पक्षाचा असल्याचेदेखील त्या म्हणाल्या.

राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ नंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून आमचे उमेदवार नारायण राणे यांना ५० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. शिवाय पक्षाची ताकददेखील वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा. गेल्या अनेक वर्षांत या मतदारसंघात पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. तालुक्याचे ज्वलंत प्रश्न तसेच राहिले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या समस्या आजदेखील कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विस्थापितांचे प्रमाण पाहावयास मिळेल. सर्वत्र उदासीनता दिसून येते, असे विश्वासराव म्हणाल्या.

गेल्या काही महिन्यांत सत्तेच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघात आणलेल्या निधीची त्यांनी माहिती दिली. साखरीनाटे येथे मिळवून दिलेल्या कोट्यवधीच्या निधीबद्दल त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow