रत्नागिरी : सणांच्या दिवसात रानसफाई तातडीने करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
रत्नागिरी : पावसाला सुरुवात होऊन तीन महिने झाले. आता जागोजागी रान वाढू लागले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातही वाढत्या रान आणि अनावश्यक तण माजू लागले आहे. आता सणांचे दिवस असल्याने अनावश्यक रान काढावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
रान वाढल्याने अशा ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने, डासांची संख्या आणि प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे डेंग्यूसह विविध साथजन्य आजारात वाढ होण्याचा धोका आहे. असे माजलेले तण काढणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या रानाने सखल भागात पाणीही साचून तेथे डबकी तयार होत आहेत. ही डबकी डासाची पैदास केंद्रे तयार होऊन त्यामुळे साथीचा आजार पसरविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
आता सणांचे दिवस असल्याने गावागावात चाकरमान्यांची तसेच पैपाहुण्यांची गर्दी वाढू लागेल. त्यामुळे वाढलेल्या रानाने जोरदार पावसात निर्माण होणारी पूरस्थितीही पाऊस गेल्यानंतर ओसरण्यास अडथळा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 03/Sep/2024
What's Your Reaction?