गुहागर : आबलोली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विद्याधर कदम यांची निवड
गुहागर : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झाली.
यावेळी विद्याधर कदम ऊर्फ आप्पा कदम यांची सलग १५ व्या वर्षी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. कदम यांनी आजपर्यंत ९८ वेळा रक्तदान केले आहे. या निवडीबद्दल सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामसेवक बाबूराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, पोलिसपाटील महेश भाटकर, गाव प्रमुख यशवंत पागडे, अनंत पागडे, सचिन कारेकर, अॅड. प्रमेय आर्यमाने, वृषाली वैद्य, शैला पालशेतकर, पायल गोणवरे, पूजा कारेकर आदींनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 04/Sep/2024
What's Your Reaction?