१२ लाखांवर चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी येणार

Sep 5, 2024 - 10:53
 0
१२ लाखांवर चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी येणार

मुंबई : मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या शहरांत गणेशोत्सवाचा मोठा थाटमाट असला, तरी गावच्या मूळ घरी येणाऱ्या गणरायाचे चाकरमान्यांना वेध लागले आहेत. दोन दिवसांवर आलेल्या गणपतीच्या स्वागताला गाव गाठण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू आहे. 

सामानाची बांधाबांध सुरू आहे. त्यातच यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा तब्बल ११ ते १२ लाख चाकरमानी मुंबईतून कोकणात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येत्या शनिवारी, ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे किमान एक-दोन दिवस आधी गावी पोहोचून तयारी करण्याचे नियोजन मुंबई-ठाण्यातील कोकणवासीयांनी केले आहे. त्यानुसार चाकरमान्यांनी मंगळवारपासून कोकणची वाट धरली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रेल्वेसह एस.टी. महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्स सज्ज झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 05-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow